Skip to main content

प्रिंटिंग क्षेत्रातला यशस्वी उद्योजक अधिक माहिती साठी बघा .

 



प्रिंटिंगमधलं वेगळं नाव म्हणून ‘प्रिंटकॉम’चा ब्रॅण्ड तयार झाला. आतापर्यंत दूरदर्शन, नेहरु सेंटर, पॅरॉगॉन सेंटर, आकाशवाणी अशा शासकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील ६०० हून अधिक ग्राहकांना सुरेश साळुंखे यांनी आपल्या सेवा दिलेल्या आहेत.


मनाच्या एका कप्प्यात अनेक घटना, प्रसंग, अविस्मरणीय कार्यक्रम सदैव आठवणीत असतात. मात्र, त्या आठवणी चिरकाल टिकून राहाव्यात, असं वाटत असेल तर त्याचं पुस्तक होणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र, हे पुस्तक वाचनीय असण्यासोबतच दर्शनीय असणंदेखील तितकंच आवश्यक आहे. ते जर दर्शनीय असेल तरच ते वाचलं जाईल. पुस्तकांना दर्शनीय करण्याचं काम एक हरहुन्नरी कलाकार गेली अनेक वर्ष करत आहे. खरंतर डिझाईन आणि प्रिंटिंग हा त्यांचा प्रांत. मात्र, त्यांनी डिझाईन केलेली पुस्तकं पाहिली की, अगदी त्या पुस्तकाच्या प्रेमात पडायला होतं. वाचनाचा कंटाळा येणारा माणूससुद्धा या प्रेमात गढून जातो. हे हरहुन्नरी कलाकार म्हणजे ‘प्रिंटकॉम’ या डिझाईन प्रिंटिंग संस्थेचे सर्वेसर्वा सुरेश साळुंखे होय.

 

 

सुरेश साळुंखेचे बाबा तुळशीराम साळुंखे हे पण कलाकारच, पण चर्मकलेतले. चप्पल तयार करण्यात वाकबगार. महाबळेश्वरमध्ये त्यांच्या नावाचा बोलबाला होता. अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी तयार केलेल्या चपला दिसतात. ‘हंटरवाली’ हा जुन्या काळातील अत्यंत गाजलेला चित्रपट. ‘फिअरलेस नादिया’ ही त्यातली नटी हातात ‘हंटर’ घेऊन घोडेस्वारी करायची. ४०च्या दशकात अशाप्रकारे स्त्री पात्र पाहणं भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीला एक धक्काच होता. या पुरुषी अवतारातील नादियाच्या पायात असलेले बूट हे तुळशीरामांनी तयार केलेले होते. एवढं सगळं असतानादेखील ते यश टिकले नाही. आर्थिक परिस्थिती खालावली. तुळशीराम, त्यांची पत्नी लक्ष्मी आणि सहा मुलांची आर्थिकदृष्ट्या ओढाताण सुरु झाली. या सहा भावंडांमधील एक म्हणजे सुरेश. यांचं मूळ गाव वाई तालुक्यातलं पसरणी, कर्मभूमी मात्र महाबळेश्वर.

 

 

सुरेश यांचे बालपण वरळीमध्ये गेले. काहीसे खडतर असेच ते दिवस होते. मराठा मंदिर शाळेत शालेय शिक्षण झाले. इथे शिकत असतानाच त्यांना नाटक-अभिनय-नेपथ्यकलेचा छंद जडला. उत्कृष्ट अभिनय व लिखाणासाठी त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली. नाटकासाठी लागणार्‍या टोप्या कागदाच्या लगद्यापासून बनवणे, नाटकातील पडदे सीन-सिनेरी रंगविणे वगैरे. एसएससीनंतर कलाशिक्षणाकडे त्यांची वाटचाल सुरु झाली. पुढे मॉडेल आर्ट स्कूलमधून ‘फाऊंडेशन कोर्स’ केला. त्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून ‘कला शिक्षक’ विषयात पदविका मिळवली. त्यानंतर वांद्रे येथील ‘स्कूल ऑफ आर्ट्स’मधून ‘अप्लाईड आर्ट’ विषयात पदविका मिळवली. हे सारं शिक्षण सुरेश यांनी काम करत आलेल्या पैशातून पूर्ण केलेलं आहे. आपल्या शिक्षणाचा कुठेही आपल्या कुटुंबावर ताण येऊ दिला नाही. १९७९ साली त्यांनी इम्पिरियल हायस्कूल येथे कला शिक्षक म्हणून नोकरी केली. कालांतराने त्यांनी एका प्रकाशकाकडे नोकरी केली. सुप्रसिद्ध अशा आर. एम. लालांच्या ‘टाटा बुक’च्या जडणघडणीत सुरेश साळुंखेंचा महत्त्वाचा वाटा आहे. मारिओ मिरांडा, कीट फ्रान्सिस, वसंत हळबे, राम वाईरकर या मुद्रणकलेतील गुरुंसोबत काम करण्याची संधी सुरेशना मिळाली. त्यांनी जवळपास ८१ पुस्तके येथे डिझाईन केली. यामध्ये व्यवस्थापन, कुकरी, व्यंगचित्र, लहान मुले याविषयांसोबतच सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे पुस्तक आदींचा समावेश होता.

 




सुरेश खूप मेहनती होते. दिवस-रात्र काम करण्याची तयारी. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जे मिळेल ते कलात्मक व आव्हानात्मक काम ते करत राहिले. यानंतर सुरेश साळुंखे औद्योगिक प्रदर्शनांमध्ये आवश्यक असणारे पॅनेल तयार करणार्‍या कंपनीत रुजू झाले. ही भारतातील क्रमांक एकची या क्षेत्रातील कंपनी होती. त्याकाळी बरेचसे पेंटिंगची कामे हाताने केली जायची. यामुळे बर्‍याच मर्यादा असायच्या. अशावेळी मोठमोठे प्रदर्शन, स्टॉल, पॅनल, स्क्रीन प्रिटिंग करुन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अनेक रंग असलेले हजारो कापडी बॅनर स्क्रीन प्रिंटिंग माध्यमाद्वारे रातोरात छापून सकाळी सर्व मुंबईभर झळकायचे ही करामत सुरेश यांची. याचदरम्यान साळुंखे स्क्रीन प्रिंटिंगची कंत्राटेसुद्धा घेऊ लागले होते. दिल्ली, चेन्नई, कोलकाता, मुंबई अशा महानगरांमध्ये ही कामे चालत. २० हून अधिक कर्मचारी त्यांच्यासोबत कार्यरत होते. दिवस-रात्र काम असल्यामुळे ताण प्रचंड होता. याचा काही प्रमाणात फटका बसला. लोक काम सोडून गेले. चार-पाच दिवस झोपच नसायची. १० वर्षे ‘एल अ‍ॅण्ड टी’, ‘बॉम्बे डाईंग’, ‘भारत बिजली’, ‘आयटीसी’, ‘ग्लॅक्सो’ अशा नामांकित कंपन्यांना सेवा दिल्या. ‘युव्ही प्रिंटिंग’ किंवा ‘स्पॉट लॅमिनेशन’ त्यावेळी हे माध्यम नव्हते. सुरेश त्यावेळेस कामात अशा प्रकारचे अद्भुत इफेक्ट्स निर्माण करत असे. एकदा तर झोपेमुळे कामात एक चूक झाली. यापुढे झेपेल इतकंच आणि झोप पुरेशी घेता येईल एवढंच काम घ्यायचं असं साळुंखेंनी निश्चित केले. मात्र, याचवेळी ‘ग्लॅक्सो’चं काम आलं. त्यांचं औद्योगिक प्रदर्शनात दालन होतं. त्यामुळे अवघ्या २४ तासांत त्यांना काम पूर्ण करुन द्यायचं होतं. सुरेशरावांनी ते अवघड काम दिलेल्या वेळेत पूर्ण केलं. या कामाबद्दल ‘ग्लॅक्सो’ कंपनीने साळुंखेचे कौतुक केले होते.

 


 

१९८९ साली सुरेश साळुंखेंनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. संगणक युगाची नुकतीच नांदी झाली होती. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांकडेसुद्धा संगणक नसताना प्रिंटिंग क्षेत्रातला पहिला संगणक साळुंखेंकडे होता. ग्राफिक डिझाईन, एक्झिबिशन पॅनेल, पुस्तकांचे डिझाईन, ऑफसेट प्रिंटिंग आदी सेवा ही कंपनी देऊ लागली. कालांतराने ‘प्रिंटकॉम’ असं गोंडस नामकरण कंपनीचं झालं. प्रिंटिंगमधलं वेगळं नाव म्हणून ‘प्रिंटकॉम’चा ब्रॅण्ड तयार झाला. आतापर्यंत दूरदर्शन, नेहरु सेंटर, पॅरॉगॉन सेंटर, आकाशवाणी अशा शासकीय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील ६०० हून अधिक ग्राहकांना आपल्या सेवा त्यांनी दिलेल्या आहेत. या संपूर्ण प्रवासात सुरेशना त्यांची पत्नी दमयंती आणि दोन कन्यांनी मोलाची साथ दिली. लक्ष्मी ‘कमर्शियल आर्टिस्ट’ असून अनुया लेखापाल आहे.

 

 

आजही डिझायनिंग आणि फॅब्रिकेशनद्वारा एक्झिबिशनच्या क्षेत्रांमध्ये सुरेश साळुंखे काम करीत असून आव्हानात्मक आणि नावीन्यपूर्ण असलेले काम हे त्यांचे पॅशन आहे. वॉर्निशिंग, युव्ही प्रिटिंग, स्पॉट युव्ही, ग्रेनिंग, एम्बॉसिंग, युव्ही लॅमिनेशन या आधुनिक तंत्रज्ञानाचा ते वापर करतात. फ्लेक्स, व्हिनायल प्रिंटिंग, सन बोर्ड, अ‍ॅक्रेलिक, तांब्याच्या-चांदीच्या प्लेट्स या घटकांचा वापर करुन त्यावर नक्षीकाम करणे हेदेखील त्यांचे आवडीचे काम. अशा प्रकारे विविध धातूंचा वापर करुन कित्येक पारितोषिक, सन्मान चिन्हे त्यांनी तयार केली आहेत. ही पारितोषिके, सन्मान चिन्हे दूरदर्शन, नेहरु सेंटरमार्फत विविध कलाकारांना देऊन गौरविण्यात आलेले आहे. त्यांचा स्वत:चा डिझाईन स्टुडिओ आहे. लक्ष्मी ही त्यांची कन्या उत्तम कमर्शियल आर्टिस्ट असून सुरेशरावांना मदत करते.

 

 

दूरदर्शन वाहिनीवरील पुरस्कार सोहळे, ५० वी राष्ट्रीय कॅरम असोसिएशन स्पर्धा, दिल्लीच्या प्रगती मैदानावरील प्लास्ट इंडिया-२००३, कॉमनवेल्थ गेम्स-२००४ या सर्व कार्यक्रमांमध्ये सुरेशरावांच्या कामाचा मोठा वाटा होता. कार्यक्रमाची योजना, मांडणी, प्रसिद्धी सामग्री, भोजन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आदींचा विचार करुन निमंत्रण पत्रिका तयार करण्यापासून ते फलक, स्टॅडिज, बॅजेस, पार्किंग पासेस, फेटे फूड कूपन्स, स्मरणिका प्रकाशन, स्मृतिचिन्ह या सार्‍या सेवा एका छताखाली ते देत. ऑफसेट प्रिंटिंग सोबतच ‘एक्झिबिशन आणि ब्रॅण्डिंग’ हे त्यांचे प्रमुख विषय आहेत. आपल्या कलेचा वारसा पुढील पिढीला देण्याचा सुरेश साळुंखेंचा विचार आहे. यासाठी एक सामाजिक संस्था निर्माण करुन समाजातील होतकरु, पण आर्थिक परिस्थितीमुळे कलेचं शिक्षण घेऊ न शकणार्‍या तरुण कलाकारांना घडविण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच या माध्यमांवर पुस्तके लिहिण्याची त्यांची इच्छा आहे. दुसर्‍याचं पुस्तक तयार करणार्‍या या अवलियाचं स्वत:चं जीवनरुपी पुस्तक कोणत्याही रोमहर्षक कादंबरीपेक्षा कमी नाही, हे नक्की!

 


Comments

Popular posts from this blog

शेती गहाण ठेवून उद्योग उभारणारा ‘विठ्ठल’

  बांधकाम उद्योगामुळे विठ्ठल सरप पाटील अकोलासारख्या ठिकाणी शंभरहून अधिक लोकांना रोजगार देऊ शकला. अल्पावधीतच ही कंपनी काही कोटी रुपयांची उलाढाल करु लागली. अकोला जिल्ह्यामधील सर्वांत मोठी नागरी वसाहत बांधण्याचे विठ्ठलरावांचे स्वप्न आहे. अकोला. विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा. अनेक ऐतिहासिक- सामाजिक-राजकीय घडामोडींचा साक्षीदार असणारा जिल्हा. अन्य जिल्ह्यांप्रमाणे येथेही उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन म्हणजे शेतीच. येथील एका शेतकर्‍याने आपली शेती गहाण ठेवली आणि स्वत:चा उद्योग उभारला. हा उद्योग उभारुन शंभरच्यावर लोकांना रोजगार दिला. सेंद्रिय शेताची आवड असलेला, पण व्यावहारिकतेचंसुद्धा तेवढंच ज्ञान असलेल्या त्या तरुणाने अचूक निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने त्यास एक उद्योजक म्हणून घडविले. शेती शेतकर्‍याला फक्त जगवते असं नव्हे, तर ती त्याला ‘उद्योजक’ म्हणून सुद्धा घडवते. हा उद्योजक म्हणजे ‘राजवी इन्फ्रास्ट्रक्चर’चे संचालक विठ्ठल सरप पाटील. शेतीला आज वेगवेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. निव्वळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकरी विविध उद्योगसुद्धा करु लागले आहेत. काहीजण नोकर्‍यासुद्धा करु लागले. पुरुषोत्तम...

शून्यातून शिखरापर्यंत : एका लहानशा दुकानापासून झाली एमडीएचची सुरुवात

  एमडीएच म्हणजे 'महाशियां दी हट्टी'... याचा सरळ अर्थ आहे प्रतिष्ठित माणसाचे दुकान. श्रीमान धर्मपाल गुलाटी यांनी ती प्रतिष्ठा कमावली. तिचा दावा त्यांच्या पित्याने आपल्या दुकानासमोर लावलेल्या बोर्डवर केला होता. आज हा ब्रँड इतका मोठा आहे की, गेल्या रविवारी धर्मपाल यांच्या मृत्यूच्या अफवेने खळबळ उडवून दिली.  धर्मपाल यांचे वय ९५ वर्षे आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून व्यवसायाचा अनुभव. त्यांचे वडील आरशांचा व्यवसाय करायचे. १९३७ ची गोष्ट. त्यांच्या वडिलांनी साबण, कपडे आणि लाकडाचा व्यवसायही करून पाहिला. १९४७ उजाडेपर्यंत धर्मपाल यांच्याकडे अपयशाचा भरपूर अनुभव जमला. फाळणीमुळे ते पाकिस्तानच्या सियालकोटमधून अमृतसरच्या विस्थापितांच्या शिबिरात पोहोचले. मग त्यांना दिल्लीत घर मिळाले. तेथे ना वीज होती ना पाणी ना शौचालय. खिशात वडिलांनी दिलेले १५०० रुपये. धर्मपाल यांनी ६५० रुपयात टांगा घेतला. २ आण्यात ते प्रवाशांना सेवा देऊ लागले. २०१६ साली याच सीईओंनी जवळपास २१ कोटी रुपये वेतन घेतले, जे एमडीएचच्या वर्षाच्या २१३ कोटी रुपयांच्या दहा टक्के इतके होते.  एमडीएचची ८० टक्के भागीदारी धर्मपाल यांच्याक...

पैसे इंटरनेट खात्याशिवाय ट्रान्सफर कसे करतात?

  जर तुम्ही भीम अ‍ॅप वापरत असाल तर मी तुम्हाला इंटरनेटशिवाय पैसे कसे पाठवू शकते, मी तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती कोणत्याही बँक खात्यात सांगणार आहे. ही सेवा वापरण्यासाठी सर्वप्रथम भिम अपमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपले बँक खाते लिंक करणे देखील आवश्यक आहे आणि यूपीआय पिन तयार करणे देखील आवश्यक आहे, असे म्हणायचे आहे की जर आपण बँक तपासली तर भीम fromपमधून शिल्लक आणि जर तुम्हाला बँकेतून पैसे कसे ट्रान्सफर करायचे हे माहित असेल तर तुम्ही इंटरनेट शिवाय पैसे पाठवू शकता, कारण तुमचे काम झाले तरी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाइल नसेल तर तुम्ही तुमच्याकडून पैसे ट्रान्सफर देखील करू शकता. आपल्या बँक खात्यातून इतर कोणत्याहीसाठी कीपॅड मोबाइल सोपा. बँक खात्यात इंटरनेटशिवाय पैसे पाठविण्याचा मार्ग आता मी तुम्हाला इंटरनेटशिवाय पैसे कसे हस्तांतरित करावे याबद्दल सविस्तरपणे सांगत आहे. सर्व प्रथम, आपल्याला आपल्या मोबाइलच्या डायल पॅडमध्ये * 99 # डायल करावे लागेल. जेव्हा आपण हा नंबर आपल्या मोबाइलमध्ये डायल करता तेव्हा आपल्यास आपल्या समोर एक संदेश येईल, जो आपला स्वागत आहे * 99 # आपल्याला स्वागत सं...